Sunday, April 10, 2011

मुंबापुरीच्या सागरी पर्यावरणालाही घरघर

सागराच्या पोटात साठणाऱ्या शेवाळामुळे जन्माला येणाऱ्या बॅक्‍टेरियांमुळे समुद्राच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने हे अत्यंत धोकेदायक असून, कोट्यवधींची लोकसंख्या सहन करीत कशीबशी उभी असणारी महानगरी मुंबई आता या धोक्‍याच्या कड्यावर पोहोचली आहे... पणजीजवळच्या दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या (एनआयओ) शास्त्रज्ञांनी मुंबईतील बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे गेल्या 40 वर्षांत सागरी पर्यावरणावर पडलेल्या ताणाचे विश्‍लेषण करून काढलेल्या अहवालात वरील निष्कर्ष नोंदविणयात आला आहे."एनआयओ'चे एस. एस. सावंत, लीना प्रभुदेसाई, के. व्यंकट हे शास्त्रज्ञ जहाजातून सोडण्यात येणाऱ्या बलास्ट वॉटरचा अभ्यास करताना (जहाज समतोल राहावे म्हणून जहाजाच्या वेगवेगळ्या कप्प्यांत गरजेनुसार पाणी भरण्यात येते. गरजेनुसार पाणी जहाजाबाहेर फेकलेही जाते. या पाण्यातून त्या त्या ठिकाणचे जीवजंतू नव्या ठिकाणी येतात. या पाण्याला बलास्ट वॉटर म्हणतात) मुंबई बंदर आणि परिसरातील पाण्यात बॅक्‍टेरियांचा वाढलेला वावर या संशोधकांना अस्वस्थ करून गेला. समुद्रातील पाण्याच्या अभ्यासासाठी निर्माण केलेल्या वीस केंद्रांवर नियमितपणे या पाण्याचे नमुने गोळा करून त्याची तपासणी करणे सुरू होते. मुख्य कामाबरोबर समांतर असे हे काम सुरू होते. वर्ष दोन वर्षाने लक्षात आले, की या मुंबईलगतच्या पाण्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण फार आहे. असे असले तर सागराच्या पोटातील पूर्ण विकसित अशी जीवसृष्टी तेथे असायला हवी होती. पण तसे काही चित्र दिसत नव्हते. परिसरातील कंपन्या, हॉटेलांचे सांडपाणी आणि शहरातील गटारे यांतून अन्नद्रव्ये समुद्राच्या पाण्यात मिसळत असतात. मुंबईलगतच्या समुद्रात शास्त्रज्ञांना हेच नेमके आढळले. तेथे बॅक्‍टेरियांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. बॅक्‍टेरियांना पाण्यात मिसळलेला प्राणवायू मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने तेथे अन्य जीवजंतू जगू शकत नाहीत. त्यामुळे अन्नद्रव्याने श्रीमंत अशा मुंबईलगतच्या समुद्रातल्या जीवसृष्टीला ओहोटी लागल्याचे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी तसा शोधनिबंधही सादर केला आहे.ंबईची लोकसंख्या 1060 मध्ये चार दशलक्ष होती, तर 2001 मध्ये ती 18.3 दशलक्षवर पोचली व 2011 मध्ये ती 22.4 दशलक्षवर पोचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यातील संबंधित अन्नद्रव्यांच्या घटकांच्या उपस्थितीची 1960 पासूनची उपलब्ध माहिती या शास्त्रज्ञांनी अभ्यासणे सुरू केले. त्यातून हा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला. त्यांनी 2001-02 मध्ये प्रत्यक्षपणे अनेक नमुनेही गोळा केले त्यांचे विश्‍लेषणही त्यांच्या निष्कर्षाचीच पुष्टी करते. "नायट्रेट'चे वाढते प्रमाण सागरी पर्यावरणाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार असा प्रश्‍न शास्त्रज्ञांना आता पडला आहे.

No comments:

Post a Comment