Saturday, April 16, 2011

एक पणती त्यांच्यासाठी...

समाजाचा एक दखलपात्र घटक निराधार आहे ही जाणीवच मन बधीर करणारी आहे. बाजारपेठेत पैसे मोडताना अशांचा चेहरा डोळ्यासमोर निश्‍चितपणे आणायला हवा. या वर्षाच्या बजेटमधील काही वाटा त्यांच्यासाठी, याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. दान फक्त धनिकांनीच करावे हे मनातून काढून टाका. ....
काय काय घेतले या गुढी पाडव्याला?..नवे कपडे, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज की नवी गाडी? वर्षातून एकदा येणारा हा उत्सव झगमगाटात साजरा करायचाच असतो. सर्वदूर लखलखाट, मिणमिणत्या पणतीच्या प्रकाशात आपल्या आप्तस्वकीयांच्या आरोग्याची शुभकामना करायची. त्यांना लक्ष्मीप्रसाद मिळावा, म्हणून शुभेच्छा द्यायच्या... हे सारे आपण आपल्यासाठी करणार, नाही का? पण... पण आपल्यातीलच काही दुर्दैवी जीव, ज्यांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळणे कठीण असते, त्यांनाही आपल्यासारख्याच भावना आहेत. त्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नसले तरी समाजबांधव म्हणून त्यांच्या भावना जपणे हे आपलेच कर्तव्य नाही का? मग त्यांची दिवाळी आपल्यासारखीच व्हावी म्हणून प्रयत्नही आपणच करायला हवेत ना? आपल्या भरलेल्या फराळाच्या ताटातील अर्धी करंजी, लाडू, चकली, अनारसे आपण त्यांच्यासाठी दिले तर आपण नक्कीच उपाशी राहणार नाही. उलट भुकेल्या जीवाला दोन घास भरविल्याचा निखळ आनंद प्रत्यक्ष अनुभवता येईल. पाडव्यानिमित्त बाजारपेठेत झगमगाट होता. खरेदीसाठी ठिकठिकाणी झुंबड होती. एकीकडे प्रकाशपर्वाचा उत्साह ओसंडून वाहत असताना समाजातील काही उपेक्षित घटकांच्या मनामध्ये मात्र अंधार कोपरा कायम आहे. अशा कोपऱ्यातील अंधार दूर करून विश्‍वासाची दिवाळी निर्माण करण्याचे नियोजन आपण नाही तर कोणी करायचे? अनाथ मुले, भिकाऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुले अशा उपेक्षित घटकांसाठी नियमित काम करणाऱ्या अनेक संस्था शहरात आहेत. त्यांच्यातर्फे दिवाळीच्या दिवसांत राज्यात विविध उपक्रम राबविले जातीलही. त्यात साऱ्यांनीच खारीचा वाटा उचलणे ही खरी दिवाळी ठरणार आहे.गोव्यात गरीबी नाही, सगळीकडे आनंद मौजमजा आहे असे गोंडस पण फसवे चित्र रंगविले जाते. अन्य राज्यात गोवा म्हणजे पृथ्वीतलावरील स्वर्ग असाच समज आहे. हे खोटे आहे हे आपणास ठाऊक असल्याने समाजातील उपेक्षित घटकांना सणांच्या निमित्ताने आनंद देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. येथील काही टक्के लोकांचेच राहणीमान सुखवस्तू आहे. सरकारच्या दयानंद निराधार योजनेतील लाभार्थ्यांची यादी व आकडेवारी पाहिली तरी समाजाचे नेमके चित्र काय याचा प्रत्यय येऊ शकतो. ही मदत मिळविण्यासाठी कित्येकजण प्रतीक्षा यादीवर आहेत ही सांगूनही खरी न वाटणारी गोष्ट. तरीही समाजाचा एक दखलपात्र घटक निराधार आहे ही जाणीवच मन बधीर करणारी आहे. बाजारपेठेत पैसे मोडताना अशांचा चेहरा डोळ्यासमोर निश्‍चितपणे आणायला हवा. या दिवाळीच्या बजेटमधील काही वाटा त्यांच्यासाठी, याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. दान फक्त धनिकांनीच करावे हे मनातून यानिमित्ताने काढून टाका. प्रगतीकडे झेपावणाऱ्या या राज्यातील दुःख आणि दारिद्य्र मिटविण्यासाठी खारीचा का होईना वाटा उचलला पाहिजे.याच संदर्भात आणखी एक धक्‍कादायक बाब म्हणजे एकूण लोकसंख्येच्या साडेचार टक्के लोक दारिद्य्र रेषेखालील जीवन जगतात. त्यांच्यासाठी सरकाराच्या अनेक सुविधा सोयी आणि सवलतीही आहेत. त्याने त्यांची आसवे पुसली जातील काहा खरा प्रश्‍न आहे.

No comments:

Post a Comment