Monday, April 4, 2011

सेतुसमुद्रमचा अभ्यास "एनआयओ'कडे

केंद्रीय जहाज उद्योग मंत्रालयाने गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडे (एनआयओ) सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या अभ्यासाचे काम सोपविले आहे. सेतुसमुद्रमच्या नव्या मार्गाच्या आखणीचे काम सध्या सुरू आहे. त्याचा समुद्रीय पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास ही संस्था करणार आहे.भारताचे दक्षिणेकडील टोक आणि श्रीलंकेचे उत्तर टोक या कालव्याद्वारे जोडण्यात येणार आहे. या कालव्याच्या मार्गाबाबत सल्ला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती. या समितीनेच "एनआयओ'च्या नावाची शिफारस केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. आर. के. पचौरी आहेत. "एनआयओ' या अभ्यासात आणखी दोन संस्थांचीही मदत घेत आहे. त्यासाठी नऊ कोटी 45 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी (निरी) व बेंगळुरु येथील भारतीय व्यवस्थापनशास्त्र संस्था याकामी "एनआयओ'ला मदत करणार आहे. कोची येथे असलेल्या "एनआयओ'च्या केंद्रामार्फत हे काम मार्गी लावले जाणार आहे. ज्येष्ठ संशोधक डॉ. सनीलकुमार हे काम पाहणार आहेत.न्नारच्या आखातातील, पाल्कच्या समुद्रधुनीतील पर्यावरणीय माहितीचे संकलन व विश्‍लेषण याअंतर्गत केले जाणार आहे. सेतुसमुद्रम प्रकल्पाची उपयुक्तता यावरही अभ्यासात भर देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment