Monday, April 23, 2012

पाण्याचा काळाबाजार - 7

जलस्रोत खात्याने पाण्याच्या काळाबाजार होत असल्याची अखेरीस दखल घेतली आहे. त्यांनी टॅंकरच्या मालकांना नोटिसा जारी केल्या आहेत. राज्यभरातील 156 टॅंकरमालकांना या नोटिसा पाठविल्याची माहिती जलस्रोत खात्याकडून मिळाली. तत्पूर्वी जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सविस्तर पत्रही पाठविले होते.
त्या पत्रात त्यांनी म्हटले होते, की अधिसूचित भागातील विहिरी आणि कूपनलिकांचे सर्वेक्षण केले जावे. त्या भागातील अशा विहिरी कूपनलिकांची नोंदणी कोणी केली नसल्यास त्यांच्यावर कारवाई करा. व्यावसायिक कारणास्तव पाणी पुरविण्यात येणाऱ्या प्रत्येक कूपनलिकेला मीटर बसविणे आवश्‍यक आहे. निर्धारित वेळेत मीटर बसवा. सर्वेक्षक आणि काम सहाय्यकांची मदत घेऊन जलस्रोत खात्याकडे नोंदणी न करता पाणी वाटप कोणत्या टॅंकरमधून केले जात आहे याची पाहणी करा. त्या टॅंकरच्या मालकांना कारवाई का करू नये अशा विचारणा करणाऱ्या नोटिसा पाठवा. मंजूर मर्यादेपेक्षा जास्त पाण्याचा उपसा होत आहे की नाही, हे तपासा आणि तसे होत असल्यास कारवाई करा. कार्यकारी अभियंत्यांनी या पत्राला प्रतसाद म्हणून राज्यभरातील टॅंकरमालकांना नोटिसा आता बजावल्या आहेत. त्यांच्याकडून नेमकी किती कर वसूल केला गेला याची माहिती मिळणे बाकी आहे. यातील दोन टॅंकर मालकांनी आपण आता पाण्याची वाहतूक करत नाही तर कंपन्यांसाठी इतर द्रवपदार्थांची वाहतूक करतो, असे कळविले आहे. इतरांनी नोटिसांना उत्तर न दिल्याने 154 जणांना त्यांनी बेकायदा जलवाहतूक केल्याचे मान्य केल्यासारखेच आहे. त्यांच्यावर आता जलस्रोत खाते नेमकी काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment